Home » एकेकाळी पेट्रोल पंपावर नोकरी करणारे धीरुभाई अंबानी असे झाले ६२ हजार कोटींच्या संपत्तीचे मालक…
Entertainment

एकेकाळी पेट्रोल पंपावर नोकरी करणारे धीरुभाई अंबानी असे झाले ६२ हजार कोटींच्या संपत्तीचे मालक…

अंबानी कुटुंबाला आज कोण ओळखत नाही.जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये त्यांची गणना होते.रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे आज भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत,तर त्यांचा धाकटा भाऊ अनिल अंबानी देखील खूप श्रीमंत आहे.काही महिन्यांपूर्वी ते देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ६८ व्या क्रमांकावर होते.या दोन्ही भावांकडे अब्जावधींची संपत्ती आहे.

अंबानी कुटुंबाचा व्यवसाय केवळ भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये पसरलेला आहे.आज हे घराणे कितीही श्रीमंत असले तरी,पण एक काळ असा होता की रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपावर महिन्याला केवळ ३०० रुपये पगाराची नोकरी करत असत आणि नंतर त्यांनी आपल्या बळावर असे स्थान मिळवले.कठोर परिश्रम आणि समर्पणाने ६२ हजार कोटीच्या मालमत्तेचे मालक बनले.

धीरूभाई अंबानी यांचा जन्म २८ डिसेंबर १९३२ रोजी गुजरातमधील जुनागढ जिल्ह्यातील चोरवाड या छोट्याशा गावात झाला.त्यांना चार भावंडे होते,वडील शिक्षक होते.असे म्हणतात की त्यांचे सुरुवातीचे जीवन संकटांनी भरलेले होते. त्यांच्या कुटुंबाला नेहमीच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला आणि त्यामुळे धीरूभाई अंबानींना त्यांचे शिक्षण सोडावे लागले.

असे म्हणतात की धीरूभाई अंबानी त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यात फळे विकायचे.त्यांना हे काम फारसे आवडले नाही,त्यानंतर त्यांनी पकोडे विकायला सुरुवात केली,पण त्यांना तेही आवडले नाही.नंतर ते येमेन या मध्य-पूर्व आशियाई देशात गेले,जिथे त्यांनी पेट्रोल पंपावर नोकरी केली. तेथे त्यांना दरमहा ३०० रुपये पगार मिळत असे.तरी त्यांना हे काम खूप आवडले आणि त्यांच्या मेहनतीच्या आणि क्षमतेच्या जोरावर ते काही वर्षांत तिथे मोठ्या पदावर पोहोचले,पण नंतर ते सर्व काही सोडून भारतात परत आले.

भारतात परतल्यानंतर धीरूभाई अंबानी यांनी त्यांचे चुलत भाऊ चंपकलाल दमानी यांच्यासोबत पॉलिस्टर धाग्याचा व्यवसाय सुरू केला आणि मसाल्यांची आयात आणि निर्यातही सुरू केली.नंतर ते वेगळे झाले,त्यानंतर धीरूभाईंनी गुजरातमधील अहमदाबाद येथे १९६६ मध्ये ‘रिलायन्स टेक्सटाइल्स’ नावाने कापड गिरणी सुरू केली.हा त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट होता,त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही आणि पुढे जात राहिले.

धीरूभाई अंबानी हे जग सोडून गेले तेव्हा त्यांची संपत्ती ६२ हजार कोटींहून अधिक होती,असे म्हटले जाते.१९९६,१९९८ आणि २००० मध्ये,एशियावीक मासिकाच्या ‘पॉवर ५० – आशियातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती’ या यादीत त्यांचा समावेश करण्यात आला.याशिवाय १९९९ मध्ये त्यांना बिझनेस इंडियाकडून ‘बिझनेस मॅन ऑफ द इयर’ पुरस्कारही मिळाला होता.

धीरूभाई अंबानी यांच्या पत्नीचे नाव कोकिलाबेन आहे. त्यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत,ज्यांची नावे मुकेश अंबानी,अनिल अंबानी,नीना कोठारी आणि दीप्ती साळगावकर आहेत.नीना कोठारी हिचे लग्न एचसी कोठारी ग्रुपचे अध्यक्ष भद्रश्याम कोठारी यांच्याशी झाले होते.२०१५ मध्ये कर्करोगामुळे त्यांचे निधन झाले.त्याचवेळी दीप्ती साळगावकर हिचे लग्न गोव्यातील एका प्रसिद्ध व्यापारी कुटुंबात झाले आहे.दत्तराज साळगावकर असे तिच्या पतीचे नाव आहे.

एकेकाळी पेट्रोल पंपावर ३०० रुपयांची नोकरी करणारे धीरुभाई अंबानी असे झाले ६२ हजार कोटींच्या संपत्तीचे मालक…

अंबानी कुटुंबाला आज कोण ओळखत नाही.जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये त्यांची गणना होते.रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे आज भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत,तर त्यांचा धाकटा भाऊ अनिल अंबानी देखील खूप श्रीमंत आहे.काही महिन्यांपूर्वी ते देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ६८ व्या क्रमांकावर होते.या दोन्ही भावांकडे अब्जावधींची संपत्ती आहे.

अंबानी कुटुंबाचा व्यवसाय केवळ भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये पसरलेला आहे.आज हे घराणे कितीही श्रीमंत असले तरी,पण एक काळ असा होता की रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपावर महिन्याला केवळ ३०० रुपये पगाराची नोकरी करत असत आणि नंतर त्यांनी आपल्या बळावर असे स्थान मिळवले.कठोर परिश्रम आणि समर्पणाने ६२ हजार कोटीच्या मालमत्तेचे मालक बनले.

धीरूभाई अंबानी यांचा जन्म २८ डिसेंबर १९३२ रोजी गुजरातमधील जुनागढ जिल्ह्यातील चोरवाड या छोट्याशा गावात झाला.त्यांना चार भावंडे होते,वडील शिक्षक होते.असे म्हणतात की त्यांचे सुरुवातीचे जीवन संकटांनी भरलेले होते. त्यांच्या कुटुंबाला नेहमीच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला आणि त्यामुळे धीरूभाई अंबानींना त्यांचे शिक्षण सोडावे लागले.

असे म्हणतात की धीरूभाई अंबानी त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यात फळे विकायचे.त्यांना हे काम फारसे आवडले नाही,त्यानंतर त्यांनी पकोडे विकायला सुरुवात केली,पण त्यांना तेही आवडले नाही.नंतर ते येमेन या मध्य-पूर्व आशियाई देशात गेले,जिथे त्यांनी पेट्रोल पंपावर नोकरी केली. तेथे त्यांना दरमहा ३०० रुपये पगार मिळत असे.तरी त्यांना हे काम खूप आवडले आणि त्यांच्या मेहनतीच्या आणि क्षमतेच्या जोरावर ते काही वर्षांत तिथे मोठ्या पदावर पोहोचले,पण नंतर ते सर्व काही सोडून भारतात परत आले.

भारतात परतल्यानंतर धीरूभाई अंबानी यांनी त्यांचे चुलत भाऊ चंपकलाल दमानी यांच्यासोबत पॉलिस्टर धाग्याचा व्यवसाय सुरू केला आणि मसाल्यांची आयात आणि निर्यातही सुरू केली.नंतर ते वेगळे झाले,त्यानंतर धीरूभाईंनी गुजरातमधील अहमदाबाद येथे १९६६ मध्ये ‘रिलायन्स टेक्सटाइल्स’ नावाने कापड गिरणी सुरू केली.हा त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट होता,त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही आणि पुढे जात राहिले.

धीरूभाई अंबानी हे जग सोडून गेले तेव्हा त्यांची संपत्ती ६२ हजार कोटींहून अधिक होती,असे म्हटले जाते.१९९६,१९९८ आणि २००० मध्ये,एशियावीक मासिकाच्या ‘पॉवर ५० – आशियातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती’ या यादीत त्यांचा समावेश करण्यात आला.याशिवाय १९९९ मध्ये त्यांना बिझनेस इंडियाकडून ‘बिझनेस मॅन ऑफ द इयर’ पुरस्कारही मिळाला होता.

धीरूभाई अंबानी यांच्या पत्नीचे नाव कोकिलाबेन आहे. त्यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत,ज्यांची नावे मुकेश अंबानी,अनिल अंबानी,नीना कोठारी आणि दीप्ती साळगावकर आहेत.नीना कोठारी हिचे लग्न एचसी कोठारी ग्रुपचे अध्यक्ष भद्रश्याम कोठारी यांच्याशी झाले होते.२०१५ मध्ये कर्करोगामुळे त्यांचे निधन झाले.त्याचवेळी दीप्ती साळगावकर हिचे लग्न गोव्यातील एका प्रसिद्ध व्यापारी कुटुंबात झाले आहे.दत्तराज साळगावकर असे तिच्या पतीचे नाव आहे.