Home » संजय राऊत यांच्या वक्तव्यावर पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया,म्हणाल्या…! 
News

संजय राऊत यांच्या वक्तव्यावर पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया,म्हणाल्या…! 

भाजप नेते गोपीनाथ मुंडे असते तर महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप युती तुटली नसती,असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.शिवसेना काय आहे हे फक्त गोपीनाथ मुंडे यांनाच कळालं होत.महाराष्ट्र भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा आणखी एकही दुसरा नेता नाही.

रविवारी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करून संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला की, दिवंगत नेत्यासारखा संवाद साधणारा,राज्याचे राजकारण जाणणारा किंवा शिवसेनेला समजून घेणारा एकही नेता भाजपमध्ये दिसत नाही.

‘मुंडे असते तर आज महाराष्ट्राचं राजकारण वेगळं असतं’

शिवसेना-भाजप युती अबाधित राहावी यासाठी मुंडे यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले,असेही राऊत म्हणाले.भाजपचे नेते  गोपीनाथ मुंडे हे जर असते तर राज्याचे राजकारण वेगळे झाले असते.मुंडे हे महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते होते आणि २५ ते ३० वर्षे आम्ही एकत्र काम केले.

पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचेही राऊत यांनी कौतुक केले आणि पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार यशस्वी झाल्याचे सांगितले.

‘काँग्रेसशिवाय आघाडी शक्य नाही’

पाच दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी राहुल गांधी यांच्या निवासस्थानी पोहोचून त्यांच्याशी चर्चा केली.या संवादानंतर ते म्हणाले की,राहुल गांधींसोबत राजकीय चर्चा झाली आहे.संदेश असा आहे की सर्वकाही ठीक आहे.

राहुल गांधींसोबत जे काही घडलं ते मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगेन असंही ते म्हणाले.विरोधकांच्या ऐक्याबाबत चर्चा झाली.विरोधकांची आघाडी झाली तर काँग्रेसशिवाय ते शक्य नाही,असे आम्ही आधीच सांगितले आहे,त्याबाबत निश्चितच चर्चा झाली आहे.राहुल गांधी मुंबईत येणार आहेत.त्याचा कार्यक्रम लवकरच येत आहे.मला वाटते जास्त बोलणे योग्य नाही.

संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर पंकजा मुंढे यांची प्रतिक्रिया म्हणाल्या ‘भविष्यात सकारात्मक विचार करायला हरकत नाही.’